Posts

Showing posts from May, 2020

२५ लक्ष करोंड चे पॅकेज जाहीर झाल्यानंतर MSME बाबत चुकीची माहिती

Image
नुकतेच आपले मा. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना लढाईत आर्थिक स्थिरता रहावी. तसेच उद्योगधंदे यांना चालना मिळावी यासाठी काही दिवसापूर्वी लॉक डाऊन ४ च्या आधी भारतीय जनतेला संभोदीत २५ लक्ष करोंड चे पॅकेज जाहीर केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी सदर पॅकेजच्या माहितीचे मा. अर्थमंत्री सीता रमन यांनी विश्लेषण केले. मग काय नंतर भारतीय जनतेतील उद्योग धंदे करणारे व करण्यास उत्सुक असणारे यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पॅकेज विश्लेषणात नमूद एम. एस. एम. ई. नोंदणी (M.S.M.E.) म्हणजे “उद्योग आधार” यावर नोंदणी असलेल्या उद्योगाना पॅकेज चा लाभ होईल. अशी माहिती कळताच त्यावर ज्या उद्योगांची नोंदणी त्यावर नाही अशांनी नोंदणी साठी धडपड करायला सुरुवात केली. त्याच बरोबर काही सायबर चालवणाऱ्या दुकानदारांनी तर या लोकांची दिशाभूल करत. ही नोंदणी काहीच दिवस आहे, तसेच ऑनलाइन इंटरनेट वर काहीनी तर थेट वेबसाइट करून ऑनलाइन पैशाची मागणी करून नोंदणी करून मिळेल या प्रकारे पैसे कामावण्याची देखील शक्कल लढवली. या सर्व गोष्टी समोर आल्या व यांची शहा निशा करीत विचार केला की याबाबत लिहाव, सर्वात आधी लोकांनी याब...

गुगलने प्ले स्टोअर वरील ८१३ ‘धोकादायक’ अ‍ॅप्स काढून टाकल्या, तुम्हीही त्वरित हटवा

Image
गुगलने प्ले स्टोअर वरून शेकडो क्रीपवेअर अ‍ॅप्स काढल्या ज्यांनी लोकांची हेरगिरी केली आणि त्यांचे बळी बनविले. गुगलने अशा ८१३   अ‍ॅप्स वर बंदी घातलेली आहे. गुगलने त्यांच्या प्ले स्टोअरमधून आतापर्यंत शेकडो संशयास्पद अ‍ॅप्स काढल्या. प्ले स्टोर वर अशा भरपूर अ‍ॅप्स आहेत ज्या लोकांना हेरगिरी करण्यासाठी मदत करतात किंवा त्या मुळात त्यासाठीच तयार करण्यात आलेल्या असतात. आणि अशा अ‍ॅप्स या बऱ्याच लोकांना हेरगिरी करून बळी बनवतात. अशा अ‍ॅप्सना क्रिपवेयर ( Creepware) म्हणतात. आशा अ‍ॅप्स डाउनलोड केलेल्या अनेक लाखो लोकांच्या मोबाइल मध्ये आहेत आणि या अ‍ॅप्सचा वापर ते आजही करत आहेत याचाच फायदा हॅकर्सनी घेऊन बरीच हेरगिरी केलेली आहे आणि करता आहेत. असा अहवाल गूगलने तयार केलेला आहे आणि यांचा अहवालानुसार गुगलने अशा ८१३ अॅप्सवर बंदी घातली आहे.   यासर्व गोष्टीत एक नवीन शब्द आपल्या समोर येतो तो म्हणजे क्रिपवेयर अ‍ॅप्स (Creepware Apps) नेमके क्रिपवेयर अ‍ॅप्स आहे तरी काय ?   क्रिपवेयर अ‍ॅप्स असे असतात जे हॅकर्स एखाद्या व्यक्तीची टेहळणी करण्यासाठी , धमकी देण्यासाठी किंवा फसवणूकीसाठी वा...

रामरक्षा स्तोत्राची निर्मिती कशी झाली व त्यांचे फायदे काय??

Image
  रामरक्षा स्तोत्र हे सर्वांना माहीत असणारे स्तोत्र आहे. मी लहान असताना आमच्या शाळेत रामरक्षा स्तोत्र पठण घेतले जायचे. सद्यस्थितीत घेतात की नाही माहीत नाही, पण घेतले पाहिजे असे मला वाटते. तरी ठीक आहे, शाळेत जाउद्या पण कमीत कमी आपण रोज तरी घरी पठण करतो का, हा तरी एक प्रश्नच आहे. पठण करत नसाल किंवा मूल पठण करत नसतील तर त्यांना सांगा करायला. कारण भगवान राम हे आपल्या भारत भूमीचे आराध्य दैवत, भगवान राम हे आपणास जगावे कशे हे शिकवतात. हा सर्व विचार मनात आल्यावर अजून एक विचार आली की, रामरक्षा कोणी लिहिली? हे माहीत आहे पण कशी लिहिली गेली?? याबाबत उत्सुकता आली. मग कशी लिहिली गेली ते   खालील प्रमाणे..     रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की , " एकदा माता पार्वतीने भगवान शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का ? " तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस ' रामरक्षा ' स्तोत्रविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की , आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. १०० कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्व...

गरज नसतांना मास्क वापरता आहात.. मग त्याचे धोके समजून घ्या. ..

Image
सद्यस्थितीत मास्क , सॅनिटाईजर इ. प्रकारच्या वस्तूत आपल्या दैनंदिन आयुष्यात भर पडलेली आहेत ती म्हणजे कोरोना या विषाणू मुळे, पण याठिकाणी आपण बोलणार आहोत ते मास्क बद्दल. मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे. याबाबत बरेच डॉक्टर यांचे अनुभव समोर येतात जर मास्क आपण अधिक काळ वापरल्यास आपल्या शरीरावर काय परिणाम होतो.... रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो. तुम्हांला अशक्तपणा जाणवू लागतो. वरील सर्व परिणाम पाहता परिणामी मृत्यू ही ओढवण्याची संभावना बळावते.   म्हणून यावर उपपाय म्हणून अनुभवी डॉक्टर यांचे काही सल्ले आहेत. ते असे की.. उपाय ·         तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा विनाकारण मास्क परिधान / लावून ठेवू नका.   मी बऱ्याचदा असे पाहतो की ,  बरेचसे लोक वातानुकूलित ( A.C.) कारमध्ये सुद्धा मास्क परिधान / मास्क चा वापर करतात, तसे करणे टाळावे. शक्यतो घरी मास्क चा वापर टाळावा. गर्दीच्या ठिकाणी, आपण घराच्या बाहेर जात असाल, जेथे एक किंवा अधिक लोक एकमेकांच्या खूपच जवळ संपर्कात...

ऐतिहासिक पंढरपूर

Image
पंढरपूर हे वारकऱ्यांचे माहेर आणि विठ्ठ ल आणि रुखमिणी हे वारकऱ्यांचे माय बाप. पण बहुतेक वारकऱ्यांना पंढरपूर च्या इतिहासा बद्दल किती माहिती असेल हा एक प्रश्नच आहे. म्हणून याबद्दल वाचताना असे वाटले की याबद्दल पोस्ट करावी जेणेकरून वारकरी च नाही तर इतर लोकाना सुदधा याबद्दल कळले पाहिजे. तर मग चला नेमका कसा आहे आपल ऐतिहासिक पंढरपूर. पंढरपूर हे दक्षिण भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे देवस्थान वेरूळचे जगदविख्यात कैलास लेणे निर्माण होणेपूर्वीचे आहे . भागवत धर्माचे आद्यपीठ , संताचे माहेर व दक्षिण काशी असे पंढरपुरास संबोधले जाते. पंढरपूर तीर्थक्षेत्राचे महत्व स्कंदपुराणात वर्णन केले आहे. मान्यखेटचे राष्ट्रकूट यांचेपैकीच सोलापूरचे राष्ट्रकूट घराणे होते. त्यातील अविधेयक नामक राजाने आपल्या कारकिर्दीच्या सोळाव्या वर्षी जयद्विढ्ढ नावाचा भार्गव गोत्रज ब्राम्हणास शंभु महादेव यांच्या  डोंगराच्या पूर्वेस असणारी आणेवारी , चाळ , कंदक , दुग्धपल्ली यासह पांडुरंगपल्ली (पंढरपूर) हे गांव दान दिले. पांडुरंगाचे देवालय पल्लीत होते.  म्हणून तिचे नांव पांडुरंगपल्ली पडले आहे , असे हे पांडुरंगपल्ली गांव...